Monday, November 23, 2020

विचारविश्व आणि पडझड - अनिल सरमळकर

अत्यंत सवंगतेचा हा काळ आहे विचार आणि तत्वज्ञानाची चर्चा ही मुळातच कधीही व्यापकपणे समाजात तेव्हाही होत नव्हती आणि आजही होत नाहीये. त्याची कक्षा मर्यादित आहे परतु विचार मेले तर संस्कृती मरते हे नक्कीच. मी सुरुवातीपासूनच प्रस्थापित आणि साचलेल्या व समाजाला घातक असलेल्या विचारांशी संघर्ष करत आलोय. पण माझे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रापुरतेच असेल फार तर. मात्र सर्वात जास्त कठीण काम असते ते खोटारड्या आणि शुप्या असलेल्या प्रगतीवादी किवा तथाकथित पुरोगामी आहोत असे स्वताला समजणार्या हौशी पोरकट आणि खुज्या विचारांच्या लोकांशी सामना करणे. असे भरमसाठ लोक आपल्या मराठी समाजात आहेत. हे लोक नेहमीच कुठल्यातरी युगपुरुषांचे नाव घेत असतात .. किवा आपल्या आपल्या जातीतील थोर समजल्या जाणार्या लेखक विचारवंताचे नाव घेत असतात. ज्यां लेखक विचारवंताचे विचार त्यानी मांडले तेव्हाही ते विचार फार काय क्रांतिकारी किवा नवे नसतात किवा ते second source असतात. फार तर उचललेले असतात कुठूनतरी.. अर्थात पाश्चिमात्य जगातुन आणि ज्यानी खरोखरच या मातीतल्या चिंतनातुन विचार मांडले त्या विचारांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.


मराठी साहित्य आणि विचार क्षेत्र काही अगदी मोजके अपवाद सोडले तर ते अस्सलतेपासुन कोसो दुर आहे.

मी गेले दहा वर्षे वैचारीक खुली चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यातही संपूर्ण देशाचे साहित्य आणि विचारविश्व ज्या उत्तर - आधुनिक किवा आधुनिकोत्तर विचार प्रवाहाला आजही तुसडेपणाने किवा तिरस्काराने पाहते त्याची चर्चा करण्याचा मी जोरदार प्रयत्न केला नंतर कळले की अभ्यास नसताना सर्वजण त्याकडे अदन्यानातुन पाहत आहेत. एवढेच काय तर स्वतःला बुद्धिवंत मानणारे अत्यंत सवंग व पोरकटपणे त्यावर बोलत आहेत किवा पूर्वग्रह दुषित आहेत. प्राध्यापक वर्तुळात तर चर्चा न केलेलीच बरी.. परंतु आज जे महाराष्ट्रभर पसरलेले जे तथाकथित कवी लेखक वगेरे आहेत जे तरुण किवा मागच्या पिढीतील आहेत ( यांचा धंदा काय ? तर तु मला महत्वाचा कवी लेखक बोल मी तुला बोलतो .. तु मला पुरस्कार दे मग तुला मी देतो )

या लोकानीच गृपिंग करुन करुन मराठी साहित्याची आणि वैचारिक क्षेत्राचा सत्यानाश केलाय. वर्तमान पत्रांची कात्रणे जमवुन कादंबरी लिहिणारे हे लोक कुठल्याही चर्चेला तयार नसतात. कित्तेक लोक आजही जुनाट झालेला भालचंद्र नेमाडे यांचा देशिवाद आणि त्यांची समीक्षा अजूनही कवटाळून आहेत ( तरच पुरस्कार मिळत असतात ) कित्येक साहित्याच्या मुख्य धारेतील ब्राह्मणी लेखकानीही नेमाडे यांच्या दिशेने वाटचाल केलीय.. आणि दलित लेखक कवी यानी फ्क्त दलित सबजेक्ट वरच लिहावे आणि अजूनही पुस्तकाच्या मागच्या पानावर प्रस्तावना एखाद्या ब्राह्मण किवा अजुन कुठल्यातरी सो कॉल्ड सवर्ण लेखकाची घ्यायची असा हा अलिखित नियम आहे तो अजूनही पाळला जात आहे ( अत्यंत खेदजनक.. घृणास्पद..कालबाह्य ) 


चर्चा करताना माझ्या लक्षात येत गेले की उत्तर आधुनिकता म्हणजे फ्क्त एक विचारसरणी आहे आणि इथे त्याचे काहीही काम नाहीये... तर काहीना ते बंडल वाटले ... कुणाच्याही गावी नव्हते की ती एक आधुनिकतेच त्याच्या सांस्कृतिकतेच Diconstruction करणारी अती उच्च समीक्षा प्रक्रिया आहे थेट सॉक्रेटिस प्लेटो पासुन आधुनिक तत्वज्ञान आणि साहित्याचे सूक्ष्म वाचन करुन त्यातील सुप्त अंश मुक्त करुन त्या संस्कृतीमधे जो एककेंद्रिवाद आहे.. जो पाश्चिमात्य संस्कृतीचा अहगंड आहे तो उघड करणे  तोही मानवी शास्त्रान्च्या सर्व शाखा व पातळ्यांवरील ... हा एक महाप्रकल्प आहे जो जगभरातील दलित शोषित आणि others असणार्या एका जगाचा सांस्कृतिक आवाज होवु शकतो .. तो आवाज जगभरातीलअनेक  महान university मधे अति उच्च प्रतिभेचे high intellectuals लेखक तत्वज्ञ गेले अर्ध शतक अविरत करत आहेत.. अमेरिकेतील कृष्णवर्णीय चळवळ भारतातील दलित चळवळ अनेक चढाव उतार पाहत आली आहे .. मात्र उत्तर आधुनिक बुद्धीवंतानी हा आवाज सतत मोठ्या पातळीवर आणि मोठ्या बौद्धिक क्षमतेने सुरु ठेवला आहे. 

अर्थात त्याची तोंडओळख करून देण्यासाठी हा लेख नाहीये तर आपले बुद्धीवंत कसे संकुचित आणि कोडगे आहेत अभ्यासापासून दुर पळणारे चर्चा टाळणारे आहेत .. आणि लेखक कवी तर काय आनंदच सगळा ...

तरीही हेच लोक एकमेकांना ठरवतात हा  हा अमुक अमुक लेखक कवी या दशकातील महत्वाचा...  हिम्मत कशी होते या लोकांची... सत्ताधारी याना पुरस्कार देतात त्यानी तर काय वाचलेलेच नसते त्यानी मातीच खाल्ली आहे !


दलित बुद्धिमत्ता पुन्हा पुन्हा आंबेडकर गौरव यातच गुरफटून गेलीय.दलित लेखक कवी विचारवंत यांच्याशी चर्चा करण्याचा हरेक प्रयत्न केलाय मात्र कुणालाही कशाशी काहीही देणेघेणे नाहीये. तर बहुजन वर्ग ज्याला म्हणतात तो एका middle class completion मानसिकतेत गुंतलेला आहे तो एक मोठी leap घेवु पाहतोय आणि कधी नव्हे ते आज धर्मवादी सरकार सत्तेत आहे तेव्हा आपण कोण आहोत नक्की पुरोगामी की धर्मवादी हे कधीही कळलेला नेहमीच संभ्रमित असलेला हा मोठा वर्ग आता स्वतःला सुरक्षित समजत आहे एका "" महान "" धर्माचा मोठा भाग म्हणुन... 

या समाजाला काहीच फरक पडत नाहीये की जग आधुनिक आहे की उत्तर आधुनिक.. 


जे कुणी लिबरल लोक आहेत ना ते ? खरे संधीसाधू..

सनातनी निदान सांगतात आम्ही असे आहोत प्रतिगामी म्हणुन मात्र संत परंपरा लोकशाहीवादी तसेच स्वताला सत्यशोधक म्हणवणारे सर्व्जण एका जुनाट कालबाह्य जाणीवांचे जुने पुराण घेवुन जगत आहेत ..

संपूर्ण जग ज्या कम्युनिस्ट विचाराने एक काळ वेढले होते त्या जागतिक चळवळीला घरघर लागली.. ( सत्ता पाशवी बनते ) मग ते तत्वज्ञान कितीही मानवतावादी असु दे .. त्याचा नाश माणसेच करतात ) ( Bad Communism)

शीतयुद्धाच्या परिस्थितीनंतर जग झपाट्याने बदलले मात्र आपले संत परंपरावाले romantic पुरोगामी लोकशाही समाजवादी आंबेडकरवादी आणि सत्यशोधक कधी बदलले नाहीत.. हे आजही आहेत महानगरात शहरात जिल्यात तालुक्यात गावात थोडे थोडे... आणि निवडणूक आली की हे सगळे मतदान तिथल्या भाईला करतात... तो थेट एखाद्या प्रस्थापित पक्षाचा असतो )


चर्चा करण्याचा प्रसंग आला की रोजचेच उत्तर येते आमची विचार परंपरा थोर आहे ... "" 

कशी काय ? असे विचारले की तोंडावर नावे फेकली जातात .. शिवाजी आणि आंबेडकर...

मग काय कोण बोलणार ... ते थोरच  आहेत. आमचे तोंड बंद .

चर्चा समाप्त.


वैचारीक संवाद यालाच शत्रू मानणारे राजकर्ते आज देशात आणि जगात राज्य करत आहेत. कला आणि साहित्य चित्रपट याला product समजून विकण्याचा काळ आहे. या अंधारात संपूर्ण जगाचेच विचारविश्व आक्रसत चालले आहे. परंतु नव्या विचारांचा आवाज स्वर खालच्या पट्टीत आज लागला तरी जग समाज तरण्यासाठी शेवटी विचारच प्रेरक ठरतात. 


महाराष्ट्र विचार प्रवाहाने अनेक चढ उतार पाहिले आहेत मात्र  तत्वज्ञानाला कधीही प्रतिष्ठा दिली गेली नाही.. नेहमीच चमकदार मांडणी केली गेलीय त्यापुढे इथली सरंजामी बधली नाही कारण तिच्यापुढे कधीही तत्वज्ञानाचे आव्हान नव्हते आणि आजही नाहीये.

कॉ. शरद पाटील यांच्यासारख्या प्रकांड प्राच्यविद्या पंडिताने केलेली मांडणी आजही परिवर्तनाचे हत्यार होवु शकत नाहिय .. त्या अती बौद्धिक मांडणीतही अनेक अंतर्विरोध आहेत ... एका क्षणी कॉमरेड पाटील मग आपली तुलना आंबेडकरांशी करु लागतात आणि कार्ल मार्क्सपासुन सुरु झालेला तो ढण्ढणता विचारवणवा मातृसत्ताक सिध्दांतापर्य्नत येतो ... तो थेट आदी माया ..

रुद्र शिवशंकरापर्यत येतो ... मग कुणीही पेलु शकत नाही कॉमरेड्ना.. स्वीकारणे दुरच ... पण आज जर शरद पाटील यांचेच Decontruction करायची वेळ आली तर त्यांचे समर्थक ? ( हा भयंकर शब्द आहे )  सर्व्जण आपले पुरोगामी झगे उतरुन ठेवतील . आणि म्ह्णणतील बचाओ शरद पाटील खतरे मे है .. गर्व से कहो हम सत्यशोधक है ( पाटील गट ) अगदी ( आठवले आंबेडकर ?,गवई, कवाडे गट ... ) Type.


मराठी साहित्य आणि विचार प्रवाहाचे खरे नुकसान दलित बहुजन वर्गातील तथाकथित लेखक कवी विचारवंत यानी केले आहे कालचे आजचे दोन्हीही..

विचार आणि साहित्य हे शोषित बहुजनाचे प्रकटीकरणाचे माध्यम व्हायला हवे होते .. काही प्रमाणात ते झालेही मात्र इथल्या प्रस्थापित सांस्कृतिक धुरीणांनी जगातील विचारांकडे जाणीवपुर्वक पाठ फिरविली पण तेच इथल्या दलित बहुजनांनी केले..एका बाजुला इथली वैदीक परंपरा मानायची नाही आणि जी अवैदिक परंपरा आहे ती बदलत्या काळाशी सुसंगत करायची नाही .. परिणाम काय ? इथल्या दोन्ही परंपरा साचुन गेल्या. नव्हे विचारच नाही ... वैदीकानी अमुकाला थोर मानायचा आणि अवैदिकानी आणखी कुणाला तरी थोर मानायचा ...


परकीय सत्तेखाली आधीच चिरडलेला आपला समाज स्वातंत्र्यानंर कशाचा सामना करतोय ? हजारो वर्षे झालेल्या वैदिक तत्वज्ञानाचा आणि त्याला विरोधी जाणारे तेवढेच जुने अवैदिक विचार ... ( पण आजही म्हणुनच आजही परकियानी घालून देलेल्या सर्व model वर आज आपण जगत आहोत ... शिक्षणव्यस्थेपासुन रस्त्याच्या फुटपाथ पर्यंत. )


आपण पंढरपूरात गेलो की वारीमधे समतावादी असतो 

आणि घरी आलो की नीव्वळ जातीयवादी. आपण सर्वच.  आयुष्यभ वारी करणाऱ्याला घरी येवुन कळले की त्याची मुलगी एखाद्या खालच्या जातीतल्या मुलाबरोबर गेली आहे.. तर मग सगळी समतेची दिंडी विसरायला होते .. आणि मग होउ शकतो त्या मुलांचा 

"" सैराट ""  हे अस आहे आपल पुरोगामीत्व.. ( मला तर या असल्या पुरोगामीत्वापेक्षा खटारा झालेल्या ST गाड्या  बर्या दिसतात ) 


जगभर रोज  चिंतन होत आहे आणि तेवढेच ते मागेही पडत आहे. आपण आपल्या मुळ विचार परंपरामधील अस्सल काही चांगले घेवुच पण असे म्हणताना त्यातील जे कालबाह्य आहे ते फेकण्याची वेळ खर तर कधीच निघुन गेली आहे .. पाश्चिमात्य जगातील ज्या हिणकस गोस्टी आहे त्या टाळू शकतो आपण. आपले लेखक कवी जे आहेत ते असे काय ग्रेट आणि नवीन सांगत आहेत ? का त्यांची पुस्तके अभ्यासक्रमाला असावी ? खरच काही महत्वाचे भाष्य ते करत आहे का ? नसतील तर त्याची लाज आम्हा कवी लेखकाना वाटायला हवी ... अमेरिकेत काही काळापूर्वी मोठया मोठ्या लेखकांची पुस्तके अभ्यासक्रमाला असु नये ती कालबाह्य झाली आहेत  यासाठी आंदोलने झाली आहेत.. शेक्सपियरवरही बंदी घालावी अशी मागणी होती ... आणि आपल्याकडे कधी अन्कलिपीही पुर्ण न वाचणार्या वशीलेबाज लोकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात ... भीषण !!!"


ज्या दलित विचार विश्वातुन अपेक्षा होती की जगण्याची आणि सांस्कृतिकतेची निकड म्हणून एक मोठा वैचारीक प्रकल्प दलित चळवळ उभारेल असे वाटत होते तिने अपेक्षाभंग केला आहे .... या लोकाना फ्क्त आठवले साहेब काय बोलले .. बाळासाहेब ( प्रकाश आंबेडकर )

काय बोलले ... याच्यातच interest आहे ...

काय बोलणार हे लोक ?  आठवलेनी केलाय कधी सामना Tatal Ambedkar चा की प्रकाश आंबेडकर ना कळेल  की यावेळी सुजात आंबेडकर च्या पिढीसमोर आंबेडकरवाद develope करण्याची कोणती आव्हाने आहेत ....  उत्तर आधुनिककतेत आंबेडकर विचार गुदमरतील की पुन्हा त्याचा रेनेझांस होइल ? 


दीर्घकाळ ' वारशाच्या" आधारे राजकारण करता येणार नाही येणार्या काळात.. हे कळण्या इतके बाळासाहेब नक्कीच उच दर्जाचे बुद्धिवादी आहेत.


Rereading of Ambedkar म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके वाचणे नव्हे .. पुन्हा एकदा बदलत्या उत्तर आधुनिक काळात आंबेडकरवादाचा नव्याने अर्थ लावणे व त्याचे विधायक अहिंसक हत्यार बनवणे ... पहायला हवे की आंबेडकर केवळ पाश्चिमात्य विचारानी प्रभावित होते की त्यानी जगाला काही वेगळे विचार दिले आहेत .  कि या त्यांच्या गौरवकाळाच्या भक्तीव्हावाच्या आंधळ्या काळात त्यांच्या Vast लेखनातील वाणीतील  दबलेले अंश तसेच दबुन राहिलेत का ? असतील तर त्याचे अर्थ लावण्याचा हा काळ आहे.


अन्यथा हजारो वर्षेच्या संस्कृतीच्या तथाकथित " थोर ' सुस्त अजगरी विळख्यातच येणारे शतक गुदमरावे  लागेल ....


पुढील लेखात चर्चा करुच.

तोवर धन्यवाद !!


---- Anil kamble Saramalkar.

     ©

………………………

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.