आजची ही चर्चा थोडी बौध्दिक आहे.. . माझ्या मुळातच लिमीटेड वाचकातील काहीना रस नसणारी वाटेल..
असो तोही वाचकांचा मूलभूत हक्क आणि choice असतो..
बॅड आणि ब्युटिफुल अशा या काळाची दोन्हीमधील
fragile line किवा निरगाठ दिसणार कशी.. ?
सर्व शास्त्रे आणि ideologies स्वतःच्या मर्यादांमध्ये आणि विरोधाभासात संपत चाललेल्या आहेत..
तरिही आहे त्या स्तिथीत तो जुनाट सांगाडा आहे त्या अवस्थेत सर्व प्रस्थापित आणि प्रस्थापित विरोधी आपापल्या ideologies ना घट्ट धरुन बसले आहेत..
परिणामी सर्व बाजुने तालिबानी तयार झाले आहेत..
कार्ल मार्क्स यानी आपल्या आयुष्याचा होम करुन साम्यवादी क्रांतीचे शास्त्रीय विचार दिले..
मार्क्स एवढे भाग्यवान की त्याना तेव्हाही आणि आजही अत्यंत बुद्धिमान प्रतिभावान समीक्षक किवा मार्क्सवादी विचारवंत मिळाले आहेत.. ते जगात एकमेव असे युगात्मक तत्वज्ञानी क्रांतिकारक विचारवंत आहेत की त्यांच्याएवढे कुणाचेच समर्थक आणि विरोधक या जगामध्ये नाहीत ...
परंतु आजही त्याना फ्रेडरिक जेमसन टेरि इगल्टन सारखे सशक्त मार्क्सवादी विचारवंत वारसदार त्याना मिळाले आहेत ..
बाबासाहेब आंबेडकर यांच जिवन तर विचार आणि प्रत्यक्ष युगप्रवर्तक कार्याच धगधगते अग्निकुंड आहे
परंतु बाबासाहेबांना अनेक काय एकही त्या तोडीचा अत्यंत प्रतिभावान समीक्षक किवा विचारवंत वारसदार आजही मिळाला नाही.. हे आपले तथाकथीत थोर बुद्धिवादी परंपरेचे नग्न वास्तव ...
माझ्या मुद्द्यावर येतो .. अत्यधिक विषम अशा व्यवस्थेवर आधारित जगाची समाज व्यवस्था पूर्ण जगामध्ये फरका फरकाने एकसारखीच आहे.. कोण आहेत याचे सुफ्त सुत्रधार ? ही व्यवस्था कधीही का कोसळत का नाहीं..
हजारो वर्षे ती वेगवेगळी रुपे घेवुन शोषणाचे पत्ते बदलत आपल्या हातीच ठेवुन नेहमीच यशस्वी का ठरत आहे ?
अर्थातच देशोदेशी अनेक क्रांत्या परिवर्तने स्थित्यंतरे झाली आहेत.. तरीही संपूर्ण क्रान्तिला जग मुकलेले आहे..
आपल्या समाजाला लागलेली गुलामीची कीड आणि प्रतिगामी व्यवस्थेतच मोक्ष शोधणे.. आपल्या मुळावर आले आहे.. विवेकानंद सर्वधर्मपरिषदेमधे म्हणाले होते..
'' पाश्चिमात्य जगाने आम्हाला विद्न्यान ध्यावे.. भारत जगाला अध्यात्म देइल... जगाचा उद्धार होइल '' ...
परंतु प्रत्यक्षात पाश्चिमात्य जगाने जे विद्न्यान आम्हाला दिले ते आपल्या नेणीवेत आज तरी रुजलेय का ?
आणि आपल्या अनुवंशिकतेतच असलेले अध्यात्म आपण आपल्याच भयंकर अशा विरोधाभासातुन सोडवुन
घेतले आहे का ? ...
विवेकानंदांच्यस उंचीचे आपण पुन्हा थोर क्रांतिकारी राष्ट्रवादी धर्म भाष्यकार निर्माण केले की फ्क्त जगाला आपण व्यावसायिक ' आध्यात्मिक गुरु दिले आहेत आजवर ( अपवाद )
स्वतःची वचनेही मी सांगतो म्हणुन मानु नका ..
सत्याच्या आणि अनुभुतीच्या कसोटीवर तपासुन घ्या
आणि मगच स्वीकारा म्हणून सांगणारा तथागत बुद्ध
अजुन समजलाय आपल्याला ? या देशाच्या मुख्य धारेतुन बुद्ध विचार नेहमीच टाळले गेले आहेत..
बुद्धाला पुन्हा भारतात बाबासाहेब आंबेडकरानी आणल्यावर बुद्ध विचार तर अत्यंत सवंग पद्धतीने
युज केले जातात. प्रेसेंट केले जातात ( अपवाद आहेत )
बुद्धाला पुन्हां भारतात आणणे ही ही वैश्विक क्रान्ति होती
बाबासाहेब नी केलेली .. ती आपण वधु वर सुचक
मण्डळाच्या पातळीवर आणुन आपण समाज म्हणुन
काय औकातीचे आहोत हे दाखवुन दिले आहे..
माझ्या समजुतीनुसार हा आंबेडकरवादाचा सगळ्यात मोठा पराभव आहे...
आणि उत्तर आधुनिक काळातही Open Marxism '
ही झॅक देरिदाने माण्डलेली संकल्पना आजच्या भल्या भल्या जागतिक ( जुनाट ) मार्क्सवाध्यानी जाणीवपूर्वक विचारात घेतली नाही... हाही वैश्विक मार्क्सवादाचा
मार्क्सवाध्यानी केलेला पराभव आहे...
मला कबूल आहे की पाश्चिमात्य विचारवंत लोकांना आणि त्यांच्या लेखनात एक शुपा अहंगंड ( superier complex .. ego असतो )
मला ते जाणवलेय अनेक्दा.. विल्यम डॅलरिंपल चे
White Mughal वाचताना मला डॅलरिंपल च्या लेखनात
ब्रिटिश नेणीव आणि ego जाणवत होता ...
या पाश्चिमात्य सांस्कृतीक सामराज्यवादाची पोलखोल केलीय Orientalism मधे एड्वर्ड सैद यानी..
पस्चिमच्या तुलनेत आम्ही Others आहोत ..
आम्ही त्यांच्या तुलनेत हरलेले हीन संस्कृती आहोत ..
रानटी असंस्कृत... .. ते आम्हाला सुसंस्कृत करणारे आहेत ..असे त्यांचे म्हणणे आहे.. हा सांस्कृतीक एक केंद्रीवाद तोडण्याचे युगातमक अती बौद्धिक कार्य
देरिदा यानी केले आहे आपल्या Deconsruct
या थियरीने.. एड्वर्ड सैद .. देरिदा प्रभावाखाली आहेत
खऱ्या आर्थाने post modernism चे हेच खरे खांब..
अर्थात युरोप अमेरिकेची सांस्कृतीक समीक्षा करणे हे खुप दुरचे काम राहिले आहे.. ते व्हायलाही हवे आहे..
परंतु आज आम्हाला आपली सडलेली सव शास्त्रे
ताकता येतिल का .. आपल्या जाती पोटजाती आणि धर्माच्या दिक्षेला चिटकुन बसलेले आपण
आपल्याच चिखलातुन तरी बाहेर येवु का ?
२१ व्या शतका अंती तरी ?
की गर्व से कहो हम .... है
आणि हजरो जाती पोटजातीच्या उतरंडीत आपण अमुकतमुकपेक्षा वरचे.. ते खालचे .. या भ्रामिक सुखात राहणार आहोत ...
काळ माफ नाही करणार...
कबुल आहे पास्चिमात्य जगाकडे वैभव आहे ..
ते त्यानी आम्हाला लुटून कमावले आहे.
पण त्यांच्याकडे... होमर आहे .. शेक्सपियर आहे
बिथोवन ... मोझार्ट. मायकेल ॲंजेलो आहे.. आणि मायकल जॅक्सनही आहे .... आणि खुप काही ...
पण हे तेच लोक आहेत.. रोमन एंपायर वाले
एक काळ सर्व पातळीवर उध्वस्त झालेले ...
आज ते जिंकलेले आहेत...
ते मार्क्सलाही प्रेमाने मानाने वागवतात..
डेरिदाचेही कौतुक करतात....
म्हणुन अमेरिका melting Pot आहे ...
म्हणून अमेरिका भौतिकतेने बलाढ्य आहे ...
आपल्या कट्ट्यावर माणसाची जात विचारली जाते ..
अमेरिकेत कट्याकट्यावर उद्याचे बिल गेट्स .. स्टीव जोब्स.. मार्क झुकरबर्ग आपली प्रतिभेचे प्रयोग करित असतात... त्याना कुणीही विचारत नाही तु migrents कि इथला मूळचा ... तसे तर कोणीच मुळचे नाहीत...
सगळेच आलेत कुठूनही... आणि उभारली अमेरिका....
आजही आपल्या देशात हे मुक्त वातावरण आणि त्याची संस्कृती रुजली नाहीये... काहीना वाटते की राष्ट्र फ्क्त आम्ही चालवु शकतो .. इतरांनी आपापल्या पायरीने रहावे
त्यामुळेच आज एक देशाचा एक मोठा समाज गट या देशाच्या स्ट्रीम पासुन दुर आहे ... त्यात देश आणि समाजाचेही नुकसान झाले आहे ...
आजही आपले राष्ट्र परिवर्तनाच्या प्राथमिक आवश्यकतापासुनही दुर आहे ..
मेन स्ट्रीम मधले लोक कशावर चालवतात हा देश ..
जुनाट संकल्पनावरच किवा मग युरोप अमेरिकेची उसनी मॉडेल्सवर ....
मग ब्युटिफुल टाईम हाच आहे .. outbreak.. चा
आधीच अस्पण बुद्ध .. विवेकानंद.. शिवाजी आंबेडकर आणि भारतीय मार्क्सवादही आम्ही कधीच हातचा गमावला आहे ...
असे नको व्हायला की आमच्या या स्वताला न ओळखण्याची किम्मत एखाद्या नव्या पारतंत्र्याच्या पॅटर्नने ध्यावी लागेल... आणि तो पॅटर्न पुन्हा गोऱ्या लोकांचाच असेल ....
आज पूर्ण देशात सर्व समाजाना जगणेच महाग करुन ठेवलेले आहे .. एक समाज्याच्या विरोधी दुसरा समाज उभा करण्याचे अत्यंत जुनाट आणि तिरस्कारपुर्ण खेळ खेळले जात आहेत.. अनेक समाज अनेक डिवाय्डर्स ...
सांस्कृतीक समिक्षेपासुन सुरु झालेली ही चर्चा या लेखापुरती संपवताना एक सांगायला हवे .. एक वेळ आज आमच्याकडे ताज महाल नसला तरी चालेल पण आम्हाला आज विवेकानंद पुन्हा ऐकावे वाचावे लागतील ...
बुद्धाला पुन्हा आपल्या मातृभूमीत परत बोलवणार्या बाबासाहेब य्यंची ही क्रान्ति वौश्विक परिप्रेक्षातून पहावी लागेल ...
अन्यथा अंधार युग आपल्याला गिळत जाइल ..
इंग्रजांच्या जागी उद्या अमेरिका असेल
पण कोणी गांधी नसेल
.......... अनिल तुकाराम सरमळकर. ©
३० / ६ / २०२०
.......
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.