अखेर अनधिकृत खाणींबाबत हरीत लवादाचे डोळे उघडले...
साईप्रसाद कल्याणकरांचा पाठपुरावा आला फळाला;वेत्ये-इन्सुलीतील दगड खाणींचा समावेश...
✒सावंतवाडी :- असीम वागळे
वेत्ये-इन्सुली भागात बेकायदा सुरू असलेल्या खाणी तात्काळ बंद करण्यात याव्यात अशा सूचना महसूल व वनविभागाला हरित लवादाकडून देण्यात आल्या आहेत.याबाबत बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती.त्यात वारंवार सूचना करून सुद्धा अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्यामुळे जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सावंतवाडी तहसीलदार आदींना या प्रकरणात प्रतिवादी करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.त्यानुसार या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,असे श्री.कल्याणकर यांनी सांगितले.
याबाबतची माहिती श्री.कल्याणकर यांनी दिली.ते म्हणाले,वेत्ये इन्सुली भागात तब्बल १७ ते १८ दगडाच्या खाणी सुरू आहेत.त्यातील फक्त सहा ते सात खाणींना अधिकृत परवानगी आहे.मात्र अधिकृत आणि अनधिकृत रित्या खाणी चालवणाऱ्या संबंधित मालकांकडून त्याठिकाणी चुकीच्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे.शासनाकडून ठरवून देण्यात आलेले नियम धाब्यावर बसवून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.दरम्यान याबाबत वारंवार महसूल विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दुसरीकडे या खाणीवर करण्यात येणाऱ्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहे. घरांचे नुकसान झाले आहे.मात्र गेली दोन वर्षे संबंधित लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही .त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ,त्याठिकाणी अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या खाणी बंद करण्यात यावे ,अशी मागणी श्री.कल्याणकर यांनी केली होती.त्यानुसार हरित लवादाने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे कल्याणकर यांनी सांगितले.
साईप्रसाद कल्याणकरांचा पाठपुरावा आला फळाला;वेत्ये-इन्सुलीतील दगड खाणींचा समावेश...
✒सावंतवाडी :- असीम वागळे
वेत्ये-इन्सुली भागात बेकायदा सुरू असलेल्या खाणी तात्काळ बंद करण्यात याव्यात अशा सूचना महसूल व वनविभागाला हरित लवादाकडून देण्यात आल्या आहेत.याबाबत बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती.त्यात वारंवार सूचना करून सुद्धा अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्यामुळे जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सावंतवाडी तहसीलदार आदींना या प्रकरणात प्रतिवादी करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.त्यानुसार या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,असे श्री.कल्याणकर यांनी सांगितले.
याबाबतची माहिती श्री.कल्याणकर यांनी दिली.ते म्हणाले,वेत्ये इन्सुली भागात तब्बल १७ ते १८ दगडाच्या खाणी सुरू आहेत.त्यातील फक्त सहा ते सात खाणींना अधिकृत परवानगी आहे.मात्र अधिकृत आणि अनधिकृत रित्या खाणी चालवणाऱ्या संबंधित मालकांकडून त्याठिकाणी चुकीच्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे.शासनाकडून ठरवून देण्यात आलेले नियम धाब्यावर बसवून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.दरम्यान याबाबत वारंवार महसूल विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दुसरीकडे या खाणीवर करण्यात येणाऱ्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहे. घरांचे नुकसान झाले आहे.मात्र गेली दोन वर्षे संबंधित लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही .त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ,त्याठिकाणी अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या खाणी बंद करण्यात यावे ,अशी मागणी श्री.कल्याणकर यांनी केली होती.त्यानुसार हरित लवादाने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे कल्याणकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.