आता सीमा तपासणी नाक्यासंदर्भात माघार नाही! साईप्रसाद कल्याणकर...
https://youtu.be/mDpYvmSmKZc
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालू खटला मागे घेण्यास घातला जातोय गळ
https://youtu.be/mDpYvmSmKZc
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालू खटला मागे घेण्यास घातला जातोय गळ
बांदा:- असीम वागळे
बांदा येथील सीमा तपासणी नाक्यासाठी सटमटवाडी येथील ३२ एकर जागा जबरदस्तीने संपादित केली गेली. त्यास जमिनमालक तसेच शेतकऱ्यांचा जबरदस्त विरोध होता. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात घडलेल्या बेकायदेशीर गोष्टी व निसर्गाचे नुकसान या मुळे २०१४ मध्ये श्री साई कल्याणकर यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये खटला दाखल केला.त्यावर संबंधितांना ४४००० झाडे लावण्याचा तसेच १००००००/- रु. दंड झाला. हा प्रश्न तसाच असताना, दिपक केसरकर माजी पालक मंत्री यांनी त्यातील ६५०० स्क्वे. मी. जागा 'चांदा ते बांदा' योजनेअंतर्गत एमटीडीसी चे प्रवेश केंद्र म्हणून लाटण्याचा प्रयत्न करीत निवडणुकीच्या तोंडावर गाजरे दाखवत लुटण्याचा प्रकार करत बेकायदेशीर भूमिपूजन केले.तेव्हा राष्ट्रीय हरित लवादाने नेमका काय आदेश दिला व झालेला बेकायदेशीरपणा याचा काडीमात्र विचार केला नाही. त्यामुळे परत निसर्गाचे नुकसान टाळावे यासाठी दुसरा खटला क्रमांक ८०/२०१९ दाखल केला.आता एमटीडीसी ने ९/०३/२०२० रोजी आपण कुठलीही निविदा काढलेली नाही व योजना बंद झाली आहे तेव्हा कल्याणकर यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नाव प्रतिवादी म्हणून कमी करून सहकार्य करावे व एमटीडीसीचा खर्च वाचवावा अशीही विनंति केली आहे. या मुळे केसरकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.तरी राजकीय दबाव आणून एमएसआरडी व ठेकेदार यांना गोत्यात आणल्या बद्दल खटला चालूच राहील व संबंधितांना दंड करावा अशी विनंती राष्ट्रीय हरित लवादला निश्चित केली जाईल असे साई कल्याणकर म्हणाले.
बांदा येथील सीमा तपासणी नाक्यासाठी सटमटवाडी येथील ३२ एकर जागा जबरदस्तीने संपादित केली गेली. त्यास जमिनमालक तसेच शेतकऱ्यांचा जबरदस्त विरोध होता. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात घडलेल्या बेकायदेशीर गोष्टी व निसर्गाचे नुकसान या मुळे २०१४ मध्ये श्री साई कल्याणकर यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये खटला दाखल केला.त्यावर संबंधितांना ४४००० झाडे लावण्याचा तसेच १००००००/- रु. दंड झाला. हा प्रश्न तसाच असताना, दिपक केसरकर माजी पालक मंत्री यांनी त्यातील ६५०० स्क्वे. मी. जागा 'चांदा ते बांदा' योजनेअंतर्गत एमटीडीसी चे प्रवेश केंद्र म्हणून लाटण्याचा प्रयत्न करीत निवडणुकीच्या तोंडावर गाजरे दाखवत लुटण्याचा प्रकार करत बेकायदेशीर भूमिपूजन केले.तेव्हा राष्ट्रीय हरित लवादाने नेमका काय आदेश दिला व झालेला बेकायदेशीरपणा याचा काडीमात्र विचार केला नाही. त्यामुळे परत निसर्गाचे नुकसान टाळावे यासाठी दुसरा खटला क्रमांक ८०/२०१९ दाखल केला.आता एमटीडीसी ने ९/०३/२०२० रोजी आपण कुठलीही निविदा काढलेली नाही व योजना बंद झाली आहे तेव्हा कल्याणकर यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नाव प्रतिवादी म्हणून कमी करून सहकार्य करावे व एमटीडीसीचा खर्च वाचवावा अशीही विनंति केली आहे. या मुळे केसरकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.तरी राजकीय दबाव आणून एमएसआरडी व ठेकेदार यांना गोत्यात आणल्या बद्दल खटला चालूच राहील व संबंधितांना दंड करावा अशी विनंती राष्ट्रीय हरित लवादला निश्चित केली जाईल असे साई कल्याणकर म्हणाले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.