Pages

Pages

Wednesday, March 4, 2020

अवकाळी पावसाच्या नुकसानात पूरग्रस्तांवर झाला अन्याय... बांदा येथील घटना

🖋️"नुकसान गरिबाचे; मात्र सरकारी दान श्रीमंताला"

📌अवकाळी पावसाच्या नुकसानात पूरग्रस्तांवर झाला अन्याय... सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचा घणाघात

बांदा:-असीम वागळे
मागील वर्षी बांदाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने माजविलेल्या  हाहाकारात  शेतकरी त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले.
       
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या नुकसानीचा अहवाल संबंधित खात्याकडे सादर केला होता. परंतु "आंधळ दळत;आणि कुत्र पिठ खातं" या उक्तीप्रमाणे शासनाने  नुकसान भरपाई मात्र  भलत्यालाच दिली असल्याचा आरोप  सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे.तसेच संबंधित प्रकारात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर  ठोस कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल; असा इशाराही  त्यांनी शासनाला दिलेला आहे.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.